मराठी भाषेचे महत्त्व | Marathi Bhasheche Mahatva | संवर्धन निबंध

मी आणि मराठी भाषा

समस्त मराठी माणसांचा एक प्रतिनिधी म्हणून आज मी आपल्याशी बोलतोय. आपली मराठी भाषा आज दुरावस्थेत आहे असे अनेक जण नक्कीच मान्य करतील. होय मलाही तसेच वाटते आहे.

मराठी भाषेचे महत्व | Marathi Bhasheche Mahatva | Marathi Sakha
मराठी भाषेचे महत्व | Marathi Bhasheche Mahatva | Marathi sakha

मराठी भाषेचे महत्व | Marathi Bhasheche Mahatva

भारतात मराठी राजभाषा असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटींच्या घरात धरली तर त्यातील साधारण १० कोटी लोक मराठी मातृभाषिक असावेत.

महाराष्ट्राच्या बाहेर वा परदेशात राहाणारे मराठी भाषिक लोक आपण सोडून देऊया. संपूर्ण युरोपात एवढ्या प्रचंड संख्येने एकच भाषा बोलणारे लोक एकही देशात नाहीत.

जर्मनी (८.६कोटी), फ्रान्स(६.५), इंग्लंड(६.७), इटली(५.८), स्पेन(४.७) असे जवळजवळ २४-२५ देश युरोप खंडात असतील पण यातील एकही देश आपल्या मातृभाषेचं पुढे काय अन् कसं होणार यामुळे चिंतेत पडलेला नाही.

पण इतकी प्रचंड लोकसंख्या असणारा मराठी समूह मात्र चिंतेत आहे. आपल्या भाषेचे पुढे काय होणार ही चिंता त्याला सतावते आहे. आपली मराठी भाषा दुरावस्थेत उभी आहे असे आपल्यापैकी अनेकांना वाटते. याची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही कारणांचा उहापोह आपण आजच्या लेखात करणार आहोत.

आजचे जग विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे. आपण इतर सर्व ज्ञान मराठीत आणले पण विज्ञान तंत्रज्ञान मराठीत आणले नाही. त्यामुळे नव्या पिढीचा ओढा इंग्रजीकडे आपसूकच वळला.

मराठीत शिकणार्‍यांसाठी नोकरीच्या वा व्यवसायाच्या भरपूर संधी आपल्याला उपलब्ध करता आल्या नाहीत.

मराठी माणसाने नोकरी एके नोकरी हाच मंत्र जपला. उद्योगधंदे, व्यवसायात उतरला असता तर मराठीचा वापर व्यवहारात वाढला असता.

सत्तेच्या साठमारीत मराठी माणूस मागे पडला. सत्ताधार्‍यांची भाषा जनता आपोआप स्विकारते अन् तिचा प्रसारही सहज होतो. पेशवाईच्या काळात इंग्रज- पेशवे यांच्यातील तह मराठीतून होत असत.

मराठी माणसाची फाजिल भाषिक सहिष्णूता मराठीसाठी मारक ठरली. स्वभाषेचा अभिमान नसणे. तिच्या वापरासाठी आग्रही नसणे. यामुळे अनेक परभाषिक कुटुंबे पिढ्यांपिढ्या महाराष्ट्रात राहातात पण त्यांना मराठीचा जराही गंध नसतो.

मराठी माणसाला स्वतःलाच मराठीचा, स्वभाषा बोलण्याबद्दल मनात एक प्रकारचा न्यूनगंड असतो. उत्तम अन् अस्खलित मराठी बोलणार्‍यापेक्षा तोडकंमोडकं इंग्रजी बोलणारा माणूस त्याला मोठा आणि श्रेष्ठ वाटतो.

मराठी माणूस स्वतः मराठी पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके विकत घेऊन वाचत नाही. त्यामुळे प्रकाशन संस्था तितक्याशा सबळ होऊ शकल्या नाहीत.

दोन मराठी माणसे एकमेकांशी प्रथम इंग्रजी किंवा हिंदीतून संवाद साधतात.

अनेक मराठी माणसांच्या दिवसाची सुरुवात गुड माॅर्निंग आणि दिवसाचा शेवट गुड नाईटने होतो.

आपल्यापेक्षा दक्षिणेकडील लोकांनी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाबरोबरच आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा जपल्या आहेत. हे आपल्याला जमले नाही हे मात्र खेदाने म्हणावे लागते.


Marathi Language | मराठी भाषा | माहिती, इतिहास,व्याकरण

मित्रहो…एखाद्या भाषेची प्रगती, तिची वाढ तिचा विकास हा त्या भाषेतील घटकांवर अवलंबून नसतो. तर ज्या समूहाची ती भाषा आहे तो भाषिक समूह नेमका काय करतो त्याचे कार्यकर्तृत्व आहे त्यावर त्या भाषेचे भवितव्य अवलंबून असते.

त्यामुळे साहजिकच भाषेच्या सर्वांगिण विकासाची जबाबदारी आपल्यावरच येऊन पडते. आणि हो उठसूट सरकार नामक संस्थेला दोष देऊन भाषिक प्रश्न कधी सुटत नसतात हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. कारण सरकारे फक्त कायदे करू शकतात, आदेश देऊ शकतात. शेवटी अमंलबजावणी जनतेला म्हणजेच पर्यायाने आपल्यालाच करावी लागते.

पण मी काय करणार. मी एक सामान्य माणूस, मला काय जमणार. असं म्हणून हातावर हात ठेवून चालणार नाही. आपणही आपला खारीचा वाटा आपल्या मायमराठीच्या संवर्धनासाठी उचलू शकतो.

खरेच मराठीसाठी मी काय बरे करू शकतो !

मी रोज एक मराठी वर्तमानपत्र विकत घेऊन वाचेन.

प्रति माह एक मराठी पुस्तक विकत घेऊन वाचेन.

शक्य असेल तिथे सर्व ठिकाणी मी मराठीचाच वापर करीन.

सर्वांशी प्रथम संवाद मराठीतून करेन. त्यानंतर जरूर भासल्यास इतर भाषांचा आधार घेईन.

मी माझ्या मुलाबाळांत मराठीचा वापर आणि अभिमान वाढीस लावेन.

मी एका अमहाराष्ट्रीय व्यक्तीस मराठी शिकविण्याचा प्रयत्न करीन.

शक्य असल्यास स्वतः मराठीतून पुस्तक निर्मिती करून इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणण्याचा प्रयत्न करीन.

मराठी भाषेच्या संवर्धानासाठी झटणार्‍या संस्था वा व्यक्तींना मी यथाशक्ती मदत करीन .

मित्रहो, वरीलपैकी एका मुद्याचा जरी आपण गांभिर्याने विचार केला अन् त्यानुसार कृती केलीत तर मराठीच्या उज्ज्वल भवितव्याची कवाडे उघडण्याच्या कामी आपला हातभार लागला असे होईल. खरेच सांगतो मित्रांनो… मातृभाषेचं काम करण्याइतकं पवित्र असे दुसरे काम नाही !

मराठी भाषेचे महत्त्व | Marathi Bhasheche Mahatva | विडिओ

Marathi Bhasheche Mahatva | FAQ काही प्रश्न 

मराठी भाषा किती जुनी आहे?

आधुनिक मराठीचे रूप म्हणजेच सध्याची मराठी साधारण १२ शे ते १३ शे वर्ष जुनी आहे. म्हणजे साधरण ८-९ व्या शतकापासून ती अस्तित्वात आहे असे मानले जाते. मराठी भाषेतला पहिला पहिला ग्रंथ कवी मुकुंदराजांचा “विवेकसिंधू” हा १११८ मध्ये लिहिला गेला आहे असे अनेक जाणकारांचे मत आहे.

प्राचीन मराठी ही “माहाराष्ट्री” या नावाने ओळखली जाते. या भाषेतील सर्वात जुना ग्रंथ सातवाहन राजा “हाल” याने संपादित केलेला “गाथासप्तशती” हा आहे. सातवाहनांचा कार्यकाल हा इसवी सन पूर्व २३० ते इसवी सन २३० मानला जातो.

Leave a comment

error: