नमस्कार मित्रहो….
आजच्या लेखात आपण आपल्या मायमराठीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. तिची रचना, तिचे भारतीय भाषांमधील, जागतिक भाषांमधील स्थान अन् भाषेची वैशिष्ट्ये माहीत करून घेऊया. भाषेचा अभ्यासदेखील आनंददायी अन् मजेशीर असू शकतो हा अनुभव आपल्यालाही नक्कीच येईल!

मराठी भाषेबद्दल थोडी माहिती घेऊ या.
- मराठी ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा असून ती भारताची एक राष्ट्रभाषादेखील आहे.
- मराठीची प्रमाण भाषा म्हणून आपण पुणेरी ब्राह्मणांची भाषा इंग्रजी राजवटीत स्विकारली. की जी फक्त ३% लोक बोलतात.
- मराठीच्या छोट्यामोठ्या जवळपास ५२ बोलीभाषा आहेत.
- महाराष्ट्रात वर्हाडी बोली ही सर्वाधिक बोलली जाते.
- मराठी ही जगात साधारण अकरा कोटी लोक बोलतात.
- तिचा सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये पंधरावा क्रमांक लागतो.
- मराठी भाषा दोन लिपीत लिहिली जाते. – बाळबोध देवनागरी , मोडी
- महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या धोरणानुसार त्रिभाषासूत्र आहे. त्यानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून महाराष्ट्र राज्याचा कारभार चालतो.
- मराठी राजभाषा दिवस – कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
मराठी राजभाषा दिन का साजरा केला जातो ?
जागतिकरणामुळे आणि इंग्रजीच्या अति हव्यासापोटी सर्वच भारतीय भाषांचे भवितव्य अंधारमय झालेले आहे. आपली मायबोली मराठीदेखील तिला अपवाद नाही. मराठी विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा नाही. केवळ मराठी माध्यमातून शिकून आपल्या पाल्याला उत्तम नोकरी मिळणार नाही असा समज समस्त मराठी पालक वर्गाचा झाला आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा पटापट बंद पडत आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळा वाढीचे प्रमाण २४७% इतके आहे. एका बाजूने गरज म्हणून इंग्रजी अन् दुसर्या बाजूने हिंदीचे आक्रमण यात मराठी भाषा आक्रसत चालली आहे. असेच चालू राहिले तर कालांतराने भाषिक ओळख नसलेला एक समाज महाराष्ट्रात निर्माण होईल. मग आपोआपच मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी साहित्य, मराठी नाटक,चित्रपट नामशेष होतील.
अशी अवस्था आपली होऊ नये म्हणून, नव्या पिढीला भाषेचे महत्त्व, तिचे वैभव कळावे, तिचा इतिहास तिच्या परंपरा कळाव्यात म्हणून वर्षाचा एक दिवस २७ फेब्रुवारी की जो ज्ञानपीठ विजेते लेखक कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. तो आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. त्या निमित्ताने सर्व संस्था, व्यवस्थापने, मंडळे,शाळा,महाविद्यालये येथे विविध साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. जेणे करून मायबोली मराठीचे चार शब्द लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतील.
अधिक महितीसाठी वाचा – मराठी सखा
- आधुनिक मराठीचे रूप म्हणजेच सध्याची मराठी साधारण १२ शे ते १३ शे वर्ष जुनी आहे. म्हणजे साधरण ८-९व्या शतकापासून ती अस्तित्वात आहे असे मानले जाते. मराठी भाषेतला पहिला ग्रंथ कवी मुकुंदराजांचा “विवेकसिंधू” हा १११८ मध्ये लिहिला गेला आहे असे अनेक जाणकारांचे मत आहे.
- सध्याची मराठी साधारण ८-९ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. म्हणजेच आजची मराठी १२-१३ शे वर्षाची आहे. प्राचीन मराठी साधारण दोन हजार वर्ष जुनी आहे.
- प्राचीन मराठी ही “माहाराष्ट्री” या नावाने ओळखली जाते. या भाषेतील सर्वात जुना ग्रंथ सातवाहन राजा “हाल” याने संपादित केलेला “गाथासप्तशती” हा आहे.
- मराठी भाषेची लिपी ही “बाळबोध देवनागरी” लिपी म्हणून ओळखली जाते.
- देवगिरी यादवांच्या काळापासून पेशवाईपर्यंत मराठी “मोडी” लिपीतही लिहिली जात होती.
- आता मोडी लिपीचा वापार होत नाही.
- मराठी भाषेत वापरले जाणारे “ळ” अक्षर आपण तमिळ भाषेतून स्विकारले आहे.
- पूर्वी मराठीत विराम चिन्हे नव्हती. ती आपण १८६० मध्ये इंग्रजी भाषेतून मराठीत आणली ( थाॅमस कॅन्डी)
- सातवाहन काळातील राजा “हाल” याने संपादित केलेला “गाथा सप्तशती” ग्रंथ मराठी भाषेतला सर्वात जुना ग्रंथ मानला जातो.
- सातवाहनांचा काळ साधारण इ. स. पूर्व २५० ते इसवी सन २५० इतका मानला जातो.
- गाथा सप्तशती या ग्रंथाचे लेखन “माहाराष्ट्री” या प्राकृत भाषेत केलेले आहे.
- हीच प्राकृत “माहाराष्ट्री भाषा” आजच्या आधुनिक मराठीचे प्राचीन रूप मानले जाते.
- इसवी सन पूर्व ६०० ते इसवी सन ६०० या काळात अनेक प्राकृत भाषा जन्माला आल्या. त्यात पाली, शौरसेनी, पैशाची, मागधी, अर्धमागधी, माहाराष्ट्री अशा अनेक प्राकृत भाषा होत्या. प्राकृत या शब्दाचा अर्थ नैसर्गिक, स्वाभाविक, मूळचा, प्रचारातला, प्रकृतीपासून उत्पन्न झालेला, सामान्य.
- अभिजात संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न स्थानिक लोकांनी केला. त्यातून अभिजात संस्कृत भाषा भ्रष्ट झाली अन् वेगळ्याच भाषा जन्माला आल्या त्या सर्व भाषा आपण “प्राकृत भाषा” म्हणून ओळखतो. ( प्राकृत भाषा… पाली, शौरसेनी, पैशाची, मागधी, अर्धमागधी, माहाराष्ट्री…इ.)
- इसवी सन ४००ते १२०० या काळात या सर्व प्राकृत भाषा भ्रष्ट होऊन प्रत्येक प्राकृत भाषेचे अपभ्रंश ( म्हणजेच त्या भाषेचे भ्रष्टरूप ) तयार झाले.
- पुढे याच प्राकृत अपभ्रंश भाषांमधून सध्याच्या प्रचलित भाषा तयार झाल्या. (इसवी सन ८००-९००)
- हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, राजस्थानी.
- प्राकृत भाषा आणि अर्वाचिन भाषा यांच्या जोड्या….
- पैशाची – पंजाबी
- माहाराष्ट्री – मराठी
- मागधी – बंगाली,बिहारी, उडिया, आसामी
- अर्धमागधी – पूर्व हिंदी
- शौरसेनी – पश्चिम हिंदी, राजस्थानी, गुजराती
अधिक महितीसाठी वाचा – मराठी भाषा
आजतागायत सहा भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे. त्यात तमिळ,कन्नड, तेलुगू, मल्याळम, उडिया आणि संस्कृत यांचा समावेश आहे. अभि म्हणजे श्रेष्ठ आणि जात म्हणजे निर्मिती. ज्या भाषेत श्रेष्ठ दर्जाची निर्मिती झाली आहे किंवा होत आहे ती भाषा अभिजात मानली जाते.ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षते खालील समितीने अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठीचे जे निकष केंद्र सरकारने ठरविले आहेत त्याची पूर्तता समितीने केलेली आहे. परंतु सरकारने अजून निर्णय घेतला नाही.
अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठीचे केंद्राचे निकष:-
१) सदर भाषा साधारण दीड ते दोन हजार वर्ष जुनी असावी.
२) त्या भाषेत उत्तम साहित्य निर्मिती झालेली असावी.
३) त्या भाषेचे प्राचीन रूप आणि अर्वाचिन रूप यात साम्य असावे.
अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास काय फायदा होईल:–
१) भारतातील साधारण ४५० विद्यापीठातून मराठी शिकण्याची सोय उपलब्ध होईल.
२) मराठीतील उत्तम ग्रंथांचे भारतीय भांषामध्ये अनुवाद करण्यात येतील.
३) महाराष्ट्रातील सुमारे १२००० ग्रंथालयांना सशक्त करण्यात येईल.
४) मराठीच्या संवर्धनासाठी झटणार्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी यांना आर्थिक सहाय्य मिळेल.
५) भाषा संवर्धनासाठी वर्षाला साधारण ५००कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होईल.
थोडक्यात पण महत्त्वाचे….
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर ती टिकेल असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. खरे तर जो पर्यंत मराठी समाज आपली भाषा व्यवहारात वापरणार नाही तोपर्यंत भाषेला उर्जित अवस्था प्राप्त होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणून सांगतो…
बोला मराठी….वाचा मराठी….लिहा मराठी…ऐका मराठी……तरच वाचेल माय मराठी माय मराठी
अधिक वाचा – मराठी भाषेचे महत्त्व | संवर्धन निबंध
- मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण असून त्यात ३४ व्यंजने आणि १४ स्वर आहेत.
- मराठी भाषेत १०स्वर + २ ॲ,ऑ इंग्रजी भाषेतील स्वर + अं ,अः अशा दोन स्वरादी आहेत.
- व्यंजनामध्ये स्वर मिळाला की वर्ण तयार होतो. क् + अ = क
- मराठी भाषेतील वर्णमालेची योजना वैज्ञानिक पद्धतीने केलेली आहे असे जाणवते.
- वर्णांची योजना अल्पप्राण, महाप्राण अशी केली आहे.
- क अल्पप्राण – ( कारण क चा उच्चार करताना कमी प्रमाणात तोंडातून हवा बाहेर पडते.)
- ख महाप्राण – (ख चा उच्चार करताना जास्त प्रमाणात हवा बाहेर पडते.)
- ह सर्वात मोठा महाप्राण – ( “ह” हा वर्ण उच्चारताना तोंडातून सर्वात जास्त हवा बाहेर पडते. म्हणून या वर्णास सर्वात मोठा महाप्राण म्हटले जाते. “ह” आपण जास्त वेळा उच्चारू शकत नाही. लगेच दम लागतो.)
- एक वर्ण अल्पप्राण, एक वर्ण महाप्राण अशी योजना केल्याने वर्णमाला सहजगत्या म्हणता येते.
- ह, श,ष,स या वर्णांना अथवा अक्षरांना “उष्मे” असे म्हणतात. कारण या अक्षरांचा उच्चार करताना तोंडातून गरम हवा बाहेर पडते.
- च,छ,ज,झ या चार वर्णांना “दंततालव्य” वर्ण असे म्हणतात.
- म्हणजे यांचा उच्चार दोन पद्धतीने करता येतो.
- जीभ दाताला स्पर्श करून उच्चार करता येतो.
- जीभ ताळूला (म्हणजे तोंडात मध्यभागी वरच्या बाजूला) स्पर्श करून उच्चार करता येतो.
- मराठीत च,छ,ज,झ हे वर्ण शब्दांच्या शेवटी आल्यास त्यांचा उच्चार “तालव्य” करता येत नाही. तो “दंतव्यच” करावा लागतो.
- ग म भ न या अक्षरांना “समरूप” अक्षरे म्हणतात. ही अक्षरे एकातून दुसरी तयार करता येतात. यावरून चला गमभन शिकूया असे म्हणतात.
अधिक वाचा – श्रावण मास निबंध मराठी
महाराष्ट्रात किती अधिकृत भाषा आहेत?
महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या धोरणानुसार त्रिभाषासूत्र आहे. त्यानुसार मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून महाराष्ट्र राज्याचा कारभार चालतो.
मराठी भाषेचा उगम कधी झाला?
सध्याची मराठी साधारण ८-९ व्या शतकापासून अस्तित्वात आहे. म्हणजेच आजची मराठी १२-१३शे वर्षाची आहे.
प्राचीन मराठी साधारण दोन हजार वर्ष जुनी आहे
मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो?
मराठी राजभाषा दिवस… कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ?
मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण असून त्यात ३४ व्यंजने आणि १४ स्वर आहेत.